Wednesday, September 3, 2014

लोकशाहीत चाललंय तरी काय?

                                                            १५ ऑगस्ट विशेष
‘‘इंग्रज चले जाव’’चा नारादेत अनेक देशभक्तानी आपल्या प्राणाची पर्वा न करता प्राणाची आहुती देत, प्राणपणाला लावून इंग्रजांना १९४७ रोजी भारतातून हाकलून लावलं, तद्नंतर १५ ऑगस्ट १९५० रोजी पहिला स्वतंत्र्य दिवस म्हणून साजरा करण्यात आला. खरा तेंव्हापासून आजपर्यंत देशात प्रजातंत्र, स्वातंत्र्य, गणराज्य, लोकशाही, आल्याच्या बाता आपण मारू लागलो, देश स्वातंत्र्य होऊन आज ६७ वर्षे पूर्ण झाली. दरवर्षी शासकीय कार्यालयात, शाळेच्या आवारात, गावोगावी, खेडोपाडी, १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन म्हणून आपण साजला करतो, खरा सत्तामात्र मुंबई-दिल्लीत आहे, आपल्या देशाची घटना लोकशाहीची आहे. मात्र या देशात उलटच तंत्र चाललंय लोकांसाठी लोकसभागृहातून चालविलेली शाही, या देशात अधिकार्‍यांची -अधिकारशाही आहे. पुढार्‍यांची-पुढारशाही आहे, अर्वत्र आदेशशाही आहे मग लोकशाही कुठे आहे. १५ ऑगस्ट १९५० रोजी या देशाची संपूर्ण जनता मालक झाली भारतीय राज्यघटणेने प्रत्येक नागरिकाला मूळभूत अधिकार दिले. जनताजनार्धन हेच देशाचे सर्वभौम आहेत. जनता हिच देशाचे खरे मालक आहेत. म्हणूनच जनतेला ‘‘मतदारराजा’’ म्हटलंजातं.
भारतीय घटनेनुसार जनतेने लोकप्रतिनिधी व लोकशाहीला स्वीकारलं, म्हणून जनतेने आपले लोकप्रतिनिधी म्हूणून राज्यासाठी-आमदार तर केंद्रासाठी-खासदार म्हणून मतदान करून सरकार चालवण्याकरिता सेवक म्हणून नेमणूक केली. ज्याअर्थी, आमदार, खासदारांची सेवक म्हणून सर्वभौनी, नेमणूक केली त्या अर्थी सर्वभौमाचा दर्जा किती मोठा आहे, याची कल्पना सर्वभौमानिच केलेली बरी, देशभरात मात्र वेगळंच चित्र आहे लोकप्रतिनिधी अधिकारी मालक व जनता सेवक हेच चित्र सरर्रास पणे आहे. सर्वभौमाच्या छातीवर बसून ‘स्व’ स्वार्थासाठी आपली पुढारशाही चालवित. अनेक ठिकाणी खाजगीकरण करून सर्वभौमाचे उदंवाटोळे तर केलेच पण सरकारी तिजोरीही मोकळ्या केल्या अधिकारी भ्रष्टाचारात मग्न आहेत, म्हणूनच सर्वभौमांना अवर्जून सांगावेसे वाटते. प्रत्येक नागरिकांने सार्वजनिक जिवनात प्रत्येक घडामोडीवर लक्ष केंद्रित करून सहभाग घ्यायला हवा, दक्ष राहून लोकप्रतिनिधीवर व अधिकारी वर्गावर लक्ष ठेवायला हवं तरच या देशाचं थोडंफार तरी भालं होईल म्हणूनच मला हा प्रश्‍न अवर्जून विचारावासा वाटतो हे सगळं लोकशाहीत चाललंय काय?